[विचारवेध, पुणे यांच्यातर्फे आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत प्रथम पुरस्कार प्राप्त झालेला माझा निबंध].
भगवान दत्तात्रेयांनी चोवीस गुरु केले होते. चराचर सृष्टीतील आणि अनेक प्राणीमात्रांना त्यांनी गुरुस्थान दिले, कारण त्यातल्या प्रत्येकापासून दत्तात्रेयांना कुठलातरी बोध झाला किंवा ज्ञान मिळाले. आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात गूगल हा जगद्गुरु बनला आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. लहानपणी आपल्या सर्वांना हवे ते दाखवणाऱ्या व हवी ती माहिती देणाऱ्या जादूच्या आरशाची गोष्ट सांगितली जायची. गूगलच्या रुपाने हा जादूचा आरसा प्रत्यक्षात अवतरला आहे असेच म्हणायला हवे. आज गूगलने आपल्या सर्वांच्या आयुष्यात या ना त्या कारणाने, या ना त्या प्रकारे प्रवेश केला आहे. अँड्रॉइड फोन्स मुळे तर गूगल सर्वव्यापी झाला आहे. सर्जेई ब्रिन व लॅरी पेज या दोन तरुणांनी २७ सप्टेंबर १९९८ रोजी गूगल या सर्च इंजिनची सुरुवात केली. ‘गूगोल’ या शब्दाशी जवळीक दाखविणारा ‘गूगल’ हा शब्द त्यांनी निवडला, कारण गूगोल या संज्ञेचा अर्थ दहाचा शंभरावा घातांक (१०१००) असा होतो. सुरुवातीला केवळ सर्च इंजिन असलेल्या गूगलने आपल्या दोन दशकांच्या वाटचालीत आता ईमेल, क्लाऊड कम्प्युटिंग, मोबाइल ऑपरेटिंग सिस्टिम, यासारख्या असंख्य विस्तृत सेवांच्या महाकाय जालाचे स्वरूप धारण केले आहे. आजच्या गूगलला तर ‘स्थिरचर व्यापून दशांगुळे उरणाऱ्या’ जगदात्म्याचीच उपमा शोभेल. Continue reading
